पोळा / बैलपोळा

                       


पोळा / बैल पोळा


 पोळा किंवा  बैलपोळा नेमका का साजरा केला जातो? 

शेतकऱ्यांच्या दृष्टीने पोळ्याचं महत्त्व ?

            दरवर्षी मोठ्या उत्साहात बैल पोळ्याचा सण साजरा केला जातो तर पाहूया बैल पोळ्याचे महत्त्व 
           पोळा किंवा बैल पोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावस्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलाचा सण आहे .
     बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो .
    विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमा भागात सुद्धा हा सण साजरा होतो. ज्याच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. 
             नागपंचमी नारळी पौर्णिमा ,रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच  श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात पोळा हा सण साजरा केला जातो.
          असा हा सर्जा राजाचा सण म्हणजे पोळा .
        हा दिवस बैलांच्या विश्रांतीचा दिवस असतो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतन) देण्यात येते .
       पोळ्याला त्यांना नदीवर /ओडयात नेऊन त्यांना आंघोळ घालतात .नंतर चरायला देऊन  घरी आणतात.                 या दिवशी बैलाच्या खांद्याला (मान जिथे शरीराला जोडली असते तो भाग) हळद व तुपाने किंवा तेलाने शेकतात. याला 'खांदा शेकणे 'अथवा 'खांड शेकणे 'म्हणतात .
         त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल (पाठीवर घालायची शाल) सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग ,गळ्यात कवड्या व घुंगराच्या माळा नवीन व्यसन, नवा कासरा (आवरायची दोरी )पायात चांदीचे वा करदुड्याचे तोडे घालतात.
          त्याला खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात. बैलाची निगा राखणाऱ्या 'बैलकरी' घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात .
          या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साज शृंगार देखील करतात.
        बैल सजवतात व पोळ्याच्या मिरवणुकीत भाग घेतात .
       गावाच्या सीमेजवळच्या शेतावर (आखाडावर आंब्याच्या पानाचे एक मोठे तोरण करून बांधतात .
     या सणा दिवशी महाराष्ट्रातल्या खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानाचे तोरण बांधले जाते.
         त्या जवळ गावातल्या सर्व बैल जोड्या वांजंत्री सनई ,ढोल ,ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात.
 या वेळेस 'झडत्या '(पोळ्याची गीते )म्हणायची पद्धत आहे .
        त्यानंतर 'मानवाईक' (ज्याला गावात मान आहे तो गावचा पाटील श्रीमंत जमीनदार )तोरण तोडतो व पोळा फुटतो .
          नंतर बैल मारुतीच्या देवळात नेतात .व नंतर घरी घेऊन त्यांना ओवाळतात. बैल नेणाऱ्यास 'बोजारा '
 (पैसे )देण्यात येतात.
          शेतकरी वर्ग हा सण विशेष महत्त्वाचा मानला गेल्याने तो उत्साहाने साजरा करण्यात येतो .


बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा सण 

        आपला भारत हा कृषिप्रधान देश आहे. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालं असलं तरी बैल पोळ्याचे महत्त्व अजूनही कायम आहे.                  
           शेतकऱ्यासोबत वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाचा एकमेव सण पोळा श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येच्या दिवशी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
         बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो .
       ज्याच्याकडे शेती नाही तो मातीच्या बैलांची पूजा करतो. पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना आवतान देण्यात येते. ओढा व नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात .



बैलाला शेतकऱ्याचा मित्र म्हटलं जातं. 
                      

               शेतकऱ्याच्या दृष्टीने बैलपोळ्याला विशेष महत्त्व आहे .बैल हे वर्षभर शेतात राबतात. शेतकऱ्यांना बैलाची साथ असते .म्हणून बैलाला शेतकऱ्याचा मित्र म्हटलं जातं .
         बैल हा शेतकऱ्याच्या आयुष्याशी जोडलेला आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो.
       बैल पोळा हा बैलांच्या सन्मानाचा सण आहे. महाराष्ट्राच्या काही भागात हा सण दोन दिवस साजरा केला जातो. 
       बैलपोळा म्हणजेच पहिल्या दिवसाला मोठा पोळा आणि दुसऱ्या दिवसाला लहान मुले लाकडाचे नंदीबैल सजवतात. 
      याला तान्हा पोळा म्हणून साजरा केला जातो. 



बैलपोळ्याच्या दिवशी काय केलं जात? 

             या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद आणि तुपाने शेकतात.
         त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल ,सर्वांगावर        गेरूचे ठिपके ,शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग ,
गळ्यात कवड्या आणि घुंगराच्या माळा ,नवीन व्यसन, नवा कासरा, पायात चांदीचे व कर्दोड्याचे तोडे घालतात.                   
        गोड पुरणपोळी आणि सुग्रास अन्नाचा नैवेद्य बैलांना दाखवला जातो .प्रत्येक शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे शेतकरी बैलाचा साज शृंगार करतात.
         बैल सजवतात त्यांची मिरवणूक काढली जाते.
     या दिवशी महाराष्ट्रातील खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानाचे तोरण बांधले जाते .गावातल्या सर्व बैल जोड्या वाजंत्री ,सनई ,ढोल ,ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात .
        अनेक गावांमध्ये पोळ्याला शर्यतीचे आयोजन करण्यात येते.
     
बैल पोळा पौरांणिक कथा 

       पौराणिक कथेनुसार प्रभू विष्णू हे कृष्णाच्या रूपात धरतीवर अवतरले होते .तेव्हापासून कृष्णाचे मामा कंसाने कृष्णाचे प्राण घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. .एकदा कंसाने कृष्णाचा वत करण्यासाठी पोलासूर नावाचा राक्षस पाठवला होता.
      तेव्हा कृष्णाने त्याचा वध केला. तो दिवस श्रावण अमावस्येचा होता. म्हणून पौराणिक कथेनुसार या दिवशी पोळा हा सण साजरा करण्यात येतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या