वसुबारस संपूर्ण माहिती

 


🐄🐄🐮 वसुबारस🐮🐄🐄


‌.     वसुबारस - संपूर्ण माहिती


‌.   Vah subah information in Marathi


‌ आपल्या मराठी संस्कृती बद्दल आणि साजरे करत असलेल्या सणाबद्दल आपल्याला ज्ञान असणे आवश्यक आहे.


‌ वसुबारस म्हणजे 'गोवत्स द्वादशी'


‌.     दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणजेच 'वसुबारस'


‌ वसुबारस दिवाळी सुरू होण्याच्या एक दिवस आधी म्हणजे धनत्रयोदशीच्या एक दिवस आधी साजरा केला जातो.


‌.        दिवाळी हा एक प्रमुख हिंदु सण असून त्याची सुरुवात  सुबारसाच्या सणाने होते.


‌ वसुबारसाला 'गोवत्स द्वादशी' असे देखील म्हणतात.


‌.   यामध्ये जनावरांची पूजा केली जाते व सुबारस या शब्दातील वस्तू म्हणजे धन (द्रव्य), त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी.


‌ वसुबारस म्हणजे काय?


‌ वसुबारस दिवाळी सुरू होण्याच्या एक दिवस आधी, म्हणजे धनत्रयोदशीच्या एक दिवस आधी साजरा केला जाते.


‌.       हिंदू कॅलेंडरनुसार 'वसुबारस' हा सण आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या बाराव्या दिवशी साजरा केला जातो. हा दिवस गाई आणि वासरांचा सन्मान, पूजा करण्यासाठी ओळखला जातो , 'वसु' म्हणजे गाय आणि 'बारस' म्हणजे बारावा दिवस, म्हणून वसु बारस हा शब्द आहे.


‌.        वसुबारसाचा उत्सव सामान्यतः महाराष्ट्र आणि गुजरात सारख्या राज्यांमध्ये आणि दक्षिण भारताच्या काही भागांमध्ये दिसून येतो. येथे दिवाळीचे सुरुवात व सुबारसाने होते.


‌.    महाराष्ट्रात 'वसुबारस' किंवा 'गोवत्स द्वादशी' म्हटले जाते.


‌.     गुजरात मध्ये याला 'बाग बारस' म्हणतात. आणि दक्षिण भारतात लोक 'नंदिनी व्रत' म्हणून हा दिवस साजरा करतात.


वसुबारसाचे महत्त्व :
                              आजही भारत हा कृषिप्रधान देश आहे . देशाचा मोठा भाग आजही शेतीच्या माध्यमातून उत्पन्न मिळवतो. म्हणून ग्रामीण भागातील अनेक भागांमध्ये ,लोक त्यांच्या गाई आणि वासराची पूजा करून हा दिवस साजरा करतात.
         कारण त्यांच्यासाठी गाय हे त्यांच्या उत्पन्नाचे प्रमुख स्तोत्र आहे. घरातील महिला गोपूजा आणि श्रीकृष्ण पूजा करतात .
        या दिवशी धनाची देवी म्हणून ओळखली जाणारी लक्ष्मी गायीचे रूप धारण करते, म्हणून लोक देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी गाईची पूजा करतात. अशी देखील आख्यायिका आहे.

वसुबारस व्रत:
                     या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते.
       या दिवशी तेला तुपात तळलेले पदार्थ आणि गाईचे दूध, तूप आणि ताक खात नाहीत.
     उडदाचे वडे, भात आणि गोडधोड पदार्थ करून ते गाईला खाऊ घालतात. घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी वासरू असलेल्या गाईची पूजा करण्याची पद्धत आहे.
        घरातील सुवासिनी बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. हळद- कुंकू आणि अक्षता वाहतात.
        
ज्याच्या घरी गुरे वासरे आहेत. त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. मग गाईला निरंजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो. समुद्रमंथनातून उत्पन्न झाले या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या