नालाचा खिळा पराभवास कारण


 नालाचा खिळा पराभवास कारण

 पूर्वीच्या काळी युद्धात घोडेस्वार यांना फार महत्त्व होते पायदळ घोडदळ ही सैन्याची प्रमुख दळे होती त्यामुळे ही दोन्ही दळे सदा सज्ज असत सेनापति घोड्यावर स्वार होऊन युद्धात भाग घेई एका सेनापतीची ही कहाणी आहे त्याचा घोडा खूप उमदा व चपळ होता घोड्याच्या चारही पायांना नाल ठोकले होते पण त्यातील एका नाल्याचा खिळा पडला होता तो ताबडतोब ठोकून घेणे आवश्यक होते पण घोड्याच्या मोतद्वाराने तिकडे दुर्लक्ष केले अचानक शत्रूने हल्ला केला सेनापती तातडीने स्वार होऊन निघाला तुंबळ युद्ध झाले घोड्याचा एक नाळ खिळखिळा होऊन निघाला घोडा लंगडू लागला युध्दात घोडा जखमी झाला घोडा नसल्याने सेनापति मारला गेला.सेनापती मारला गेल्याने सेनेचा पराभव झाला एका खिळाच्या अभावाने नाल निघाला नाल नसल्याने घोडा निकामी  झाला. घोडा नसल्याने सेनापती मेला. सेनापती मेल्याने सेना हरली.

 बोध - वेळीच दुरुस्ती न केल्याने मोठे नुकसान होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या